Tuesday, September 15, 2009

मरहट्टे

"अकस्मात यावे, बक मच्छ उचलुन नेतो तैसा घाला घालावा, शिपाईगिरीची शर्थ करावी, प्रसंग पडल्यास माघारे पळुन जावे. खाण्यापिण्याच्या दरकार बाळगीत नाहित. पाऊस, ऊन, थंडि, अंधारी काहि न पाहता घोड्यावरच हरभरे व भाकरी चटणी, कांदे खाऊन धावतात. त्यांस कसे जिंकावे? एक्या मुल्कात फौज आली म्हणोन त्यांजवर रवानगि करावि तो दुसरेकडे जाऊन ठाणी घेतात, मुलुख मारीतात, हे आदमी नव्हत भूतखाना आहे."


- मराठ्यांच्या गनिमी युध्दतंत्राविषयी शत्रुंचा अभिप्राय कसा होता? त्याचे मल्हार रामराव चिटणीस बखरीत केलेले वर्णन.(म.वि.को. खंड ४)

सरफ़रोशी की तमन्ना....

सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है
देखना है ज़ोर कितना बाज़ू-ए-क़ातिल में है

(ऐ वतन,) करता नहीं क्यूँ दूसरा कुछ बातचीत,
देखता हूँ मैं जिसे वो चुप तेरी महफ़िल में है
ऐ शहीद-ए-मुल्क-ओ-मिल्लत, मैं तेरे ऊपर निसार,
अब तेरी हिम्मत का चरचा ग़ैर की महफ़िल में है
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है

वक़्त आने पर बता देंगे तुझे, ए आसमान,
हम अभी से क्या बताएँ क्या हमारे दिल में है
खेँच कर लाई है सब को क़त्ल होने की उमीद,
आशिकों का आज जमघट कूचा-ए-क़ातिल में है
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है

है लिए हथियार दुश्मन ताक में बैठा उधर,
और हम तैयार हैं सीना लिए अपना इधर.
ख़ून से खेलेंगे होली गर वतन मुश्क़िल में है,
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है

हाथ, जिन में है जूनून, कटते नही तलवार से,
सर जो उठ जाते हैं वो झुकते नहीं ललकार से.
और भड़केगा जो शोला सा हमारे दिल में है,
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है

हम तो घर से ही थे निकले बाँधकर सर पर कफ़न,
जाँ हथेली पर लिए लो बढ चले हैं ये कदम.
ज़िंदगी तो अपनी मॆहमाँ मौत की महफ़िल में है,
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है

यूँ खड़ा मक़्तल में क़ातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसी के दिल में है?
दिल में तूफ़ानों की टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको न आज.
दूर रह पाए जो हमसे दम कहाँ मंज़िल में है, सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है

ज़िस्म भी क्या ज़िस्म है जिसमे न हो ख़ून-ए-जुनून
क्या लड़े तूफ़ान से जो कश्ती-ए-साहिल में है
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है
देखना है ज़ोर कितना बाज़ू-ए-क़ातिल में है

- शहिद रामप्रसाद बिस्मिल.

महाराष्ट्रदर्शन

महाराष्ट्राचा प्रत्येक धोंडा एकेका रोमहर्षक प्रसंगाचा साक्षी. त्याला जर कधी काळीं जिभा फुटल्या, तर तो जे सांगेल ते ऐकुन प्रेते उठतील. कबंधे जिवंत होतील. षंढांच्या अंगी वारे भरेल! असा सांस्कृतिक आणि समरतीर्थांचा महाराष्ट्रात अपूर्व योग घडून आला आहे. स्वातंत्र्यप्रियता ही तर महाराष्ट्राची आंगिक प्रवृत्ती. अंग्रेजांना संपूर्ण भारत जिंकण्यापूर्वी शेवटची लढाई इथल्याच ठेंगण्या काळासर मावळ्यांशी खेळावी लागली. ती युध्दश्री, ती रग, तो आवेश, अजूनही मावळला नाही. कधी मावळेलसे दिसतहि नाही. हा गुण डोंगरावरुन वाहत येणार्या भराट वार्याचा आहे.कृष्णा, कोयना, पवना, भीमेच्या पाण्याचा आहे. तेव्हा महाराष्ट्र श्रीमंत आहे. स्वाभिमानी तर आहेच आहे. कणखर आहे. चिवट आहे. मोडेल पण वाकणार नाही. मित्रांसाठी जीव देणारा आहे. भक्तीभावाने गहिवरणारा आहे. लढताना प्राण तळहाती घेणारा आहे. थोडासा भांडखोरही आहे. थोडीशी हिरवटपणाची झांक आहे. पण किती? चंद्रावरल्या डागाएव्हढी. ज्याने महाराष्ट्रावर लोभ केला,त्याच्या पायतळी आपला जीव अंथरण्यापुरता तो भोळाही आहे. आथित्यशील आहे. किंबहुना तो आहे गिरीशिखरांच्या दैवतासारखा. शंभुमहादेवासारखा. संतापला तर त्रिभुवने पेटवील. संतुष्ट झाला तर कारुण्याची गंगा वाहवील.

- गो.नी.दा.